अखंड "चिऊताई" गिरीचे लक्षणे.!
अखंड "चिऊताई" गिरीचे लक्षणे.! स्वातंत्र्यलढ्या दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, विशेषतः १९४३–१९४५ दरम्यान आझाद हिंद फौज (INA) आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी निधी उभारण्यासाठी भारतीयांकडे सोने, दागिने आणि आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यांनी आग्नेय आशियातील (बर्मा, सिंगापूर, मलेशिया इ.) भारतीय समाजाला आवाहन करताना असे सांगितले होते की स्वातंत्र्यासाठी “तन, मन आणि धन” अर्पण करावे. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि अनेक महिलांनी स्वतःचे दागिने व सोन्याचे दान केले. त्या आधी लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याच्या चळवळीसाठी लोकांकडून वर्गणी, देणग्या आणि जनसहभाग मागितला होता. पुढे महात्मा गांधी यांनी “टिळक स्वराज्य निधी” नावाचा प्रसिद्ध निधी १९२१ मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ सुरू केला होता. या निधीसाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर पैसे, दागिने आणि देणग्या जमा करण्यात आल्या. एवढी सगळी इतिहासाची उजळणी करायची बाब म्हणजे , स्वातंत्र्य लढा हा कोणत्याही मजबूत संसाधने अथवा रिसोर्स शिवाय जनतेच्या सहभागातून सुरू झालेला लढा होता....