साबणाचे जोडलेले तुकडे आणि महाराष्ट्र ..!!
प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचा अनुभव असेल , महिना अखेरच्या काळात साबणाचे तुकडे जोडून त्याचा कितीही एकसंघ साबणाचा गोळा तयार करण्याचा प्रयत्न केला तरी , त्यावर पाणी पडले आणि भरभर अंगाला साबण चोळला तरी , त्याचे व्हायचे ते तुकडे वेगळे होतातच..!! महाराष्ट्रातील राजकारणाचे सेम टू सेम असेच काहीसे झाले आहे. वरकरणी महायुती आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेतेमंडळी कितीही एकमेकांच्या सोबत राहण्याच्या आणाभाका घेत असले तरी ; सत्य परिस्थिती नेमकी काय आहे हे सर्वसामान्य जनतेला चांगलेच समजते. आजच्या घडीला , सांगली , शिरूर , माढा , बारामती , मावळ रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि जे मतदारसंघ कदाचित माझ्या माहितीत देखील नसतील अश्या कितीतरी मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस आहे. वास्तविक ही वेळ महाराष्ट्रावर का आली ? या अश्या प्रकारची अभद्र युती किंवा आघाड्या का झाल्या ? ह्याच्या मुळाशी जर गेलो तर , त्याचे मुख्य कारण सापडते ते म्हणजे ; महाविकास आघाडीची स्थापना..!! राजकारणात जर-तरला फारसा अर्थ नसतो मात्र ; तरीसुद्धा महा विकासआघाडी चा प्रयोग झाला नसता तर , पुढील पक्ष फोडाफोडी झाली नसती ही वस्तुस्थिती